मित्र मैत्रीणींनो अनुभव कथन थोडेसे विस्ताराने
वार्धक्याच्या नेहमीच्या खुणा सोडल्यास सरांचा आवाज आणि बोलण्याची ढब थेट शाळेत घेऊन गेली तसेच किंचीत जड जीभेचे पण सुस्पष्ट उच्चार सरांची तासाची सुरवात टेबल खुर्ची ठरावीक पद्धतीने ठेऊन व्हायची आम्हाला बसायला सांगितले तेव्हा हे आठवले. आमची ओळख समजुन घेताना ‘मी पूर्णवेळ घर सांभाळते’ हे अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे हा त्यांचा विचार महत्वाचा आहे. शर्मिलाने आपल्या ग्रुपचा उद्देश समजावल्यावर त्यांना आपला खुप अभिमान वाटला. केवळ आत्मकेंद्रीत प्रगतीत समाधान न बाळगता समाजासाठी काय करता येईल ह्याचे मग मार्गदर्शन झाले.सरांची प्रवचनकार शैली, जोडीला स्वानुभवाचे दाखले ह्यातुन उमगले की साध्या सोप्या सरळ गोष्टींनी बरेच साध्य होते त्यासाठी काही भव्य दिव्य आभासी करायचा गरज नाही. सर प्रार्थना समाजाचे अनुयायी त्यामुळे विचारांवर तो पगडा जाणवत होता पण त्यात अतिरेक नव्हता. सरांच्या कार्यात त्यांच्या पत्नींचे योगदान आहे. सर तसे हरहुन्नरी चार पुस्तकांचे लेखन, कविता, गाणी! एका वेबसाईटवर हे उपलब्द्ध आहे. सरांचा हा वारसा त्यांचे सुपुत्र चालवतात. रफी आणि कुसुमाग्रजांची कविता गाऊन त्याची झलक झाली. सरांची दैनंदिनी सामाजिक कार्य कसे करता येते ह्या विचारांचा एक बहुमूल्य पण थोडासा दुर्लक्षित ठेवा आहे. साधी रहाणी, तत्वनिष्ठा, सामाजिक कर्तव्याचे भान, ह्या वयातही अजुन काही करायचे आहे सारे खुप काही शिकवून गेले. आपल्या सर्व ग्रुपला भेटायची इच्छा व्यक्त केली, भेटींचा स्विकार केला, कौतुक केले, आशीर्वाद दिला, सुंदर विचाराची शिदोरी दिली, छापिल संदेश न देता मुहुर्ताची वाट न पाहता लगेच कामाला लागा हे सर्व न मागता निरपेक्ष पणे दिले. बस आणि काय हवे! निरोप घेऊन बाहेर पडल्यावर एकच विचार आला. हि पिढी आता इतिहासजमा होणार त्याचबरोबर त्यांचे विचार, जीवनशैली! त्यांचे विद्यार्थी म्हणून आपण हे सर्व पुढे न्यायचा प्रामाणिक प्रयत्न करुया!
काही लेखनचुका आढळल्या तर समजुन घ्या खुप दिवसांनी निबंध लेखन झाले. पुढच्या भेटीची आतुरतेने वाट बघत आहे🙏
Very well written Sharad.